Saturday, January 25, 2025

"कृषी व्यवसायाला समृद्ध करण्यासाठी दुग्ध व्यवसायाची महत्त्वाची भूमिका"- कुलगुरू मा. प्रा. (डॉ.) इन्द्र मणि

 आदर्श एनसीसीच्या वतीने कुलगुरू मा. प्रा. (डॉ.) इन्द्र मणि यांचे स्वागत


हिंगोली येथील आदर्श शिक्षण संस्थेचे कला, वाणिज्य विज्ञान महाविद्यालयात प्रधानमंत्री उच्चतर शिक्षा अभियान (PM-USHA) पुरस्कृत दुग्धशास्त्र विभागाच्या वतीने दिनांक २५ जानेवारी २०२५ रोज शनिवारला "सस्टेनेबल डेअरी डेव्हलपमेंट इन इंडिया" या विषयावर एक दिवसीय राष्ट्रीय चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले होते. सदरील चर्चासत्राला अध्यक्ष म्हणून आदर्श शिक्षण संस्थेचे अध्यक्ष मा. श्री कमलकिशोरजी काबरा हे उपस्थित होते तसेच सन्माननीय संस्था सदस्य मा. श्री शिवप्रसाद काबरा मा. श्री रमेशचंद्रजी मुंदडा उपस्थित होते. चर्चासत्राचे उद्घाटक म्हणून वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ परभणी येथील कुलगुरू मा. प्रा. (डॉ.) इन्द्र मणि हे उपस्थित होते. प्रमुख बीजभाषक म्हणून जबलपूर येथील जवाहरलाल नेहरू कृषी विश्वविद्यालयातील शास्त्रज्ञ डॉ. राजेंद्र सिंह ठाकुर हे उपस्थित होते.

उद्घाटकीय भाषणात कुलगुरू मा. प्रा. (डॉ.) इन्द्र मणि म्हणाले की, ही भूमी संत आणि महंताची भूमी असून संस्कृती प्रधानभूमी आहे. येथील कृषी व्यवसाय श्रेष्ठ आहे तसेच हे क्षेत्र 'सिल्क आणि मिल्क' साठी महत्त्वाचे आहे असे सांगून या चर्चासत्रामधील मिळवलेल्या ज्ञानाचा फायदा मराठवाड्यासोबतच महाराष्ट्राच्या विकासासाठी निश्चितच होईल असे मत व्यक्त करताना कृषी व्यवसायाला समृद्ध करण्यासाठी दुग्ध व्यवसायाची महत्त्वाची भूमिका आहे हे प्रतिपादन केले. परिसंवादाच्या बीज भाषणातून डॉ. राजेंद्र सिंह ठाकूर यांनी कृषी,आरोग्य, संस्कृती, पर्यावरण यावर आपले महत्त्वपूर्ण विचार मांडले. तसेच शाश्वत विकासाची ध्येय गाठण्यासाठी दुग्ध व्यवसायाच्या विकासाला चालना देणे गरजेचे आहे असे विचार मांडले.

अध्यक्ष मा. श्री कमलकिशोरजी काबरा यांनी सहभागी संशोधकांना आपल्या भाषणातून शुभेच्छा दिल्या. तसेच महाविद्यालयाचे प्राचार्य प्रो. डॉ. विलास आघाव यांनी चर्चासत्राच्या उत्स्फूर्त सहभागींचे स्वागत करत महाविद्यालयाची भूमिका स्पष्ट केली. हे महाविद्यालय सतत नाविन्यपूर्ण उपक्रम राबविण्यासाठी आग्रही असते असे मत व्यक्त केले.

सदरील चर्चासत्राचे प्रास्ताविक दुग्धशास्त्र विभाग प्रमुख चर्चासत्राचे समन्वयक प्रो. डॉ. पांडुरंग गंगासागरे यांनी केले. उद्घाटकीय कार्यक्रमाचे सूत्रसंचालन गणित विभाग प्रमुख डॉ. सचिन हाटकर यांनी केले तर आभार प्रदर्शन संयोजन सचिव डॉ. प्रशांतकुमार जोशी यांनी केले.

राष्ट्रीय चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले होते. या भेटीदरम्यान वसंतराव नाईक कृषी विद्यापीठाचे कुलगुरू मा. प्रा. (डॉ.) इन्द्र मणि यांना आदर्श एनसीसी विभागाच्या वतीने गार्ड ऑफ ऑनर देण्यात आला .याप्रसंगी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. विलास आघाव यांनी स्वागत केले, याप्रसंगी उपप्राचार्य प्रा. रमेश दळवी, एनसीसी विभाग प्रमुख मेजर पंढरीनाथ घुगेडॉ. सोपानदेव खरात     एनसीसी विद्यार्थी उपस्थित होते.

चर्चासत्राच्या समारोप समारंभाचे अध्यक्षस्थानी वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाच्या पशुसंवर्धन दुग्ध शास्त्र विभागाचे प्रमुख डॉ गजेंद्र लोंढे हे होते. त्यांच्या हस्ते या कार्यक्रमातील भित्तिपत्रक प्रदर्शनातील विजेत्यांना स्मृतीचिन्ह आणि प्रमाणपत्र देऊन सन्मानित करण्यात आले. चर्चासत्रास पशुसंवर्धन आणि दुग्धशास्त्र विभागातील डॉ पी. व्ही पडघन, डॉ शंकर नरवाडे, डॉ एन एस कांबळे, डॉ आर पाटील यांच्यासह पदव्युत्तर आणि आचार्य पदवीचे सर्व विद्यार्थी सहभागी झाले होते.

सदरील चर्चासत्राच्या यशस्वी नियोजनासाठी दुर्दशास्त्र विभागाचे विभाग प्रमुख संयोजक प्रो. डॉ. पांडुरंग गंगासागरे, IQAC समन्वयक डॉ. सचिन पत्की, PM USHA समन्वयक प्रा. अमजदखान पठाण, ऑर्गनायझिंग सेक्रेटरी डॉ. प्रशांतकुमार जोशी, को-कन्वेनर डॉ. एस. पी. शिंदे, कार्यालयीन अधीक्षक दिलीप दुबे, कैलास डिडाळे तसेच महाविद्यालयातील शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यांनी परिश्रम घेतले. याप्रसंगी महाराष्ट्र महाराष्ट्र बाहेरील एकूण १३८ संशोधक, अभ्यासक विद्यार्थी उपस्थित होते.





No comments:

Post a Comment