आदर्श एनसीसीच्या वतीने कुलगुरू मा. प्रा. (डॉ.) इन्द्र मणि यांचे स्वागत
उद्घाटकीय भाषणात कुलगुरू मा. प्रा.
(डॉ.) इन्द्र मणि म्हणाले की, ही भूमी संत
आणि महंताची भूमी असून
संस्कृती प्रधानभूमी आहे. येथील कृषी
व्यवसाय श्रेष्ठ आहे तसेच
हे क्षेत्र 'सिल्क आणि मिल्क' साठी महत्त्वाचे आहे असे
सांगून या चर्चासत्रामधील मिळवलेल्या ज्ञानाचा फायदा मराठवाड्यासोबतच महाराष्ट्राच्या विकासासाठी निश्चितच होईल
असे मत व्यक्त करताना कृषी
व्यवसायाला समृद्ध करण्यासाठी दुग्ध व्यवसायाची महत्त्वाची भूमिका आहे हे
प्रतिपादन केले. परिसंवादाच्या बीज
भाषणातून डॉ. राजेंद्र सिंह
ठाकूर यांनी कृषी,आरोग्य, संस्कृती, पर्यावरण यावर आपले
महत्त्वपूर्ण विचार मांडले. तसेच शाश्वत विकासाची ध्येय गाठण्यासाठी दुग्ध व्यवसायाच्या विकासाला चालना देणे
गरजेचे आहे असे
विचार मांडले.
अध्यक्ष मा. श्री कमलकिशोरजी काबरा यांनी सहभागी संशोधकांना आपल्या भाषणातून शुभेच्छा दिल्या. तसेच
महाविद्यालयाचे प्राचार्य प्रो. डॉ.
विलास आघाव यांनी चर्चासत्राच्या उत्स्फूर्त सहभागींचे स्वागत करत
महाविद्यालयाची भूमिका स्पष्ट केली. हे
महाविद्यालय सतत नाविन्यपूर्ण उपक्रम राबविण्यासाठी आग्रही असते
असे मत व्यक्त केले.
सदरील चर्चासत्राचे प्रास्ताविक दुग्धशास्त्र विभाग प्रमुख व चर्चासत्राचे समन्वयक प्रो.
डॉ. पांडुरंग गंगासागरे यांनी केले. उद्घाटकीय कार्यक्रमाचे सूत्रसंचालन गणित
विभाग प्रमुख डॉ. सचिन
हाटकर यांनी केले तर
आभार प्रदर्शन संयोजन सचिव डॉ.
प्रशांतकुमार जोशी यांनी केले.
राष्ट्रीय चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले होते.
या भेटीदरम्यान वसंतराव नाईक कृषी
विद्यापीठाचे कुलगुरू मा. प्रा.
(डॉ.) इन्द्र मणि
यांना आदर्श एनसीसी विभागाच्या वतीने गार्ड ऑफ ऑनर
देण्यात आला .याप्रसंगी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.
विलास आघाव यांनी स्वागत केले, याप्रसंगी उपप्राचार्य प्रा. रमेश
दळवी, एनसीसी विभाग प्रमुख मेजर पंढरीनाथ घुगे, डॉ. सोपानदेव खरात व एनसीसी विद्यार्थी उपस्थित होते.
चर्चासत्राच्या
समारोप समारंभाचे अध्यक्षस्थानी वसंतराव नाईक मराठवाडा कृषी
विद्यापीठाच्या पशुसंवर्धन व दुग्ध शास्त्र विभागाचे प्रमुख डॉ
गजेंद्र लोंढे हे होते. त्यांच्या हस्ते या
कार्यक्रमातील भित्तिपत्रक प्रदर्शनातील विजेत्यांना स्मृतीचिन्ह आणि प्रमाणपत्र देऊन
सन्मानित करण्यात आले.
चर्चासत्रास पशुसंवर्धन आणि दुग्धशास्त्र विभागातील डॉ
पी. व्ही पडघन, डॉ शंकर
नरवाडे, डॉ एन एस
कांबळे, डॉ आर ए
पाटील यांच्यासह पदव्युत्तर आणि आचार्य पदवीचे सर्व
विद्यार्थी सहभागी झाले होते.

No comments:
Post a Comment