Thursday, May 25, 2023

वनामकृविचे शास्‍त्रज्ञ डॉ दिपक पाटील उत्‍कृष्‍ट कृषी संशोधन पुरस्‍कारांने सन्‍माननीत

राहुरी येथे आयोजित जॉइंट ऍग्रोस्को कार्यक्रमात सत्‍कार 

कृषीमंत्री ना श्री  अब्दुल सत्तार यांच्या हस्ते वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठातील बदनापुर येथील कृषि संशोधन केंद्राचे प्रभारी अधिकारी डॉ दीपक पाटील यांना उत्कृष्ट कृषी संशोधन पुरस्कार २०२३ प्रदान करण्यात आला. यावेळी व्यासपीठावर वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाचे कुलगुरू मा डॉ इन्‍द्र मणि  सह राज्यातील इतर कृषी विद्यापीठाचे कुलगुरू, महाराष्ट्र कृषी संशोधन विस्तार परिषदेचे महासंचालक मा श्री रावसाहेब भागडे, संशोधन विस्तार डॉ हरिहर कौसडीकर आदीसह प्रमुख अधिकारी उपस्थित होते.

डॉ दिपक पाटील मागील वीस वर्षांपासून ते कृषी संशोधन केंद्रात संशोधन निर्मिती करण्याचे काम  सातत्याने करतात मूग ,तूर ,हरभरा या पिकाचे त्यांनी अनेक सुधारित वाण निर्मितीत आपले योगदान दिले आहे. मार्गदर्शनाखाली तूर वान बिडीएन ७११ ची निर्मिती मागील १० वर्षांपूर्वी झालेली आहे, हा वाण राज्यातील कोरडवाहू शेतीसाठी वरदान ठरला आहे. या वाणानी राज्यात 50 टक्या पर्यन्त तूर क्षेत्रावर लागवड केला जातो. मूग या पिकात बिडीएन २००३-०२ हा वाण गेल्या दहा वर्षापेक्षा अधिक काळापासून उत्पादन सातत्य ठेवून आहे. मागील दोन वर्षापूर्वी त्यांनी गोदावरी म्हणजे बिडीएन २०१३-४१ या वाणाची निर्मिती केली आहे, हा वाण मर व वांझ रोगास प्रतिकारक आहे आणि बागायती शेतकरी अधिक पसंदी देत आहे शिवाय अतिवृष्टीत ही तग धरत असल्याने हा वान तूर उत्पादक शेतकऱ्यांमध्ये प्रिय झाला आहे. या कृषी शास्त्रज्ञाची उत्कृट कृषी संशोधक पुरस्काराने सन्मानित होणे हे विद्यापीठाच्‍या दृष्‍टीने अभिमानाची बाब

 

Wednesday, May 24, 2023

राज्‍यस्‍तरीप खरीप हंगामपूर्व आढावा बैठक २०२३

 

मुंबई येथे दिनांक २४मे रोजी राज्‍यस्‍तरीप खरीप हंगामपूर्व आढावा बैठक २०२३ पार पडली. यावेळी माननीय  मुख्‍यमंत्री मा ना श्री एकनाथ शिंंदे, उपमुख्‍यमंत्री मा ना श्री देवेंद्र फडणवीस, कृषी मंत्री मा ना श्री अब्‍दुल सत्‍तार, मा ना श्री संदीपान भुमरे, मुख्‍य सचिव मा श्री एकनाथ डवले, कृषि आयुक्‍त मा श्री सुनिल चव्‍हाण आदी.

Friday, May 5, 2023

वनामकृविच्‍या लातुर येथील कृषि महाविद्यालयातील अनुसुचित जाती लाभार्थी मुलींच्‍या वसतीगृहाचे माननीय कृषिमंत्री मा ना श्री अब्‍दुल सत्‍तार यांच्‍या हस्‍ते उदघाटन


वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठांतर्गत असलेल्‍या लातुर येथील कृषि महाविद्यालयाच्‍या नुतन बांधकाम केलेले अनुसुचित जाती लाभार्थी मुलींच्‍या वसतीगृहाचे उदघाटन दिनांक १ मे रोजी महाराष्‍ट्र दिनी राज्‍याचे माननीय कृषीमंत्री मा ना श्री अब्‍दुल सत्‍तार यांच्‍या हस्‍ते करण्‍यात आले. कार्यक्रमाच्‍या अध्‍यक्षस्‍थानी कुलगुरू मा डॉ इन्‍द्र मणि हे होते तर व्‍यासपीठावर प्रमुख अतिथी म्‍हणुन हिंगोली लोकसभा मतदार संघाचे खासदार मा श्री हेमंतजी पाटील, माजी विधानसभा सदस्‍य मा श्री पाशा पटेल, माजी विधानसभा सदस्‍य डॉ दिलीपराव देशमुख, लातुरचे जिल्‍हाधिकारी मा श्री बी पी पृथ्‍वीराज, शिक्षण संचालक डॉ धर्मराज गोखले, कुलसचिव डॉ धिरजकुमार कदम, सहयोगी अधिष्‍ठाता डॉ गजेंद्र लोंढे, विद्यापीठ उपअभियंता डॉ देवानंद टेकाळे, आदींची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी महाविद्यालयाच्‍या विद्यार्थी-विद्यार्थींनीनी सां‍स्‍कृतिक कार्यक्रमात नृत्‍य व कला सादर केल्‍या.

मार्गदर्शनात मा ना श्री अब्‍दुल सत्‍तार म्‍हणाले की, शेती विकासाकरिता कृ‍षि विषयाचा शालेय अभ्‍यासक्रमात समावेश करण्‍यात आला असुन देशातील महाराष्‍ट्र हे पहिले राज्य आहे. शेतक-यांचे अपघात विम्‍याचे प्रलंबीत प्रकरणे तात्‍काळ निकाली काढण्‍यात येतील. शेतक-यांना उच्‍च दर्जाचे बियाणे, खते यांचा कोठेही तुटवडा पडु दिला जाणार नाही असे आश्‍वासन देऊन परभणी कृषी विद्यापीठ बीजोत्‍पादनाकरिता १००० एकर जमिनवर वहितीखाली आणली असल्‍याबाबत कौतुक केले. तसेच प्रत्‍येकी तीनशे विद्यार्थ्‍याकरिता एक असे एकुण दोन मुलांचे व मुलीं वसतीगृहे बांधकाम करिता व महाविद्यालयाच्‍या सभागृहाचे अद्ययावत करण्‍याकरिता अतिरिक्‍त निधी देऊन दिनांक १४ ऑगस्‍ट रोजी माननीय मुख्‍यमंत्री व उपमुख्‍यमंत्री यांच्‍या हस्‍ते भुमिपुजन करण्‍याचे आश्‍वासन दिले.

कुलगुरू मा डॉ इन्‍द्र मणि आपल्‍या भाषणात म्‍हणाले की, विद्यापीठांचे मुले व मुलीं अत्‍यंत गुणवंत असुन देश पातळीवर सांस्‍कृतिक क्षेत्रात सुवर्णपदक प्राप्‍त केले, ही अभिमानास्‍पद बाब आहे. विद्यार्थी व शेतकरी कल्‍याणाकरिता विद्यापीठ प्रयत्‍नशील आहे. विद्यापीठाने विविध पिकांचे उत्‍कृष्‍ट वाणांची निर्मिती केली असुन याचा लाभ शेतकरी बांधवा होत असल्‍याचे म्‍हणाले. प्रास्‍ताविकात डॉ धर्मराज गोखले यांनी कृषि महाविद्यालय व विद्यापीठाच्‍या शैक्षणिक कार्याबाबत माहिती दिली. कार्यक्रम यशस्‍वीतेकरिता प्राचार्य डॉ बाबासाहेब ठोंबरे यांच्‍या नेतृत्‍वाखाली महाविद्यालयाचे प्राध्‍यापक, अधिकारी, कर्मचारी व विद्यार्थी यांनी परिश्रम घेतले.