Monday, September 25, 2023

बाजरी पिकाचा पिक पद्धतीत समावेश करावा ...... कुलगुरू मा. डॉ इन्‍द्र मणि

मौजे वरुडी तालुका बदनापूर जिल्हा जालना येथे बाजरी अद्यारेषा पिक प्रात्‍यक्षिकास कुलगुरु मा डॉ. इन्‍द्र मणि यांची भेट

कुलगुरु मा डॉ. इन्‍द्र मणि यांनी दिनांक 2५ सप्‍टेंबर रोजी मौजे वरुडी तालुका बदनापूर जिल्हा जालना येथे बाजरी अद्यारेषा पिक प्रात्‍यक्षिकास भेट दिली. राष्ट्रीय कृषि संशोधन प्रकल्प छत्रपती संभाजी नगर  यांच्यामार्फत वरूडी गावात व परिसरात १०० एकरवर एएचबी १२०० या संकरित बाजरी वाणाचे बियाणे शेतकरी बांधवाना देण्यात आले.

मार्गदर्शनात कुलगुरू मा डॉ इन्‍द्र मणि म्‍हणाले की, २०२३ हे वर्ष आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष म्‍हणुन साजरे करण्‍यात येत आहे. तृणधान्याचे व विषेशतः बाजरी पिकाचे आहारातील महत्व व हवामान बदलास अनुकूल, कमी पाण्यात, कमी खर्चात, बाजरी हे पिक घेता येते, विद्यापीठ विकसित एएचबी १२०० या वाणामध्ये लोहाचे व जस्तचे प्रमाण अधिक असल्याने आहारात समावेश केल्यास लोहाचे प्रमाण वाढण्यास व प्रतिकारक्षमता वाढण्यास मदत होते. भविष्यात अन्नसुरक्षा बरोबरच पौष्टिक सुरक्षा महत्वाची असल्याचे विशद केले. बाजरी पिकाचा पिक पद्धतीत समावेश करण्याचे देखील त्यांनी शेतकरी बंधू यांना आवाहन केले.

मा.कुलगुरु महोदयांनी उपस्थित शेतकरी यांचा समावेत प्रत्यक्ष पिकाची पाहणी केली व शेतकरी बंधू यांच्याशी चर्चा केली. शेतकर्यांनीही आपल्या शेतावर मोठ्या प्रमाणात बाजरी पिकाखालील क्षेञ व उत्पादन घ्यावे व आहारामध्ये समावेश करावा असे आवाहन मा कुलगुरू यांनी केले. त्यांनी बदनापूर कृषि महाविद्यालयातील ग्रामीण कृषि कार्यानुभवचे विद्यार्थ्‍यांशी चर्चा केली. याप्रसंगी सहयोगी संचालक (संशोधन) डॉ सूर्यकांत पवार] डॉ दिपक पाटील, डॉ दिलीप हिंगोले, डॉ चंद्रकांत पाटील, डॉ आशिष बागडे, श्री जयकिशन शिंदे, श्री हरिभाऊ शिंदे, कृष्णा शिंदे, बद्रीनाथ शिंदे आदीसह विद्यार्थी मोठ्या प्रमाणावर उपस्थित होते.






No comments:

Post a Comment