शास्त्रज्ञ सातत्याने संशोधनात गुंतलेले आहेत, कृषी विद्यापीठेही महत्त्वाची भूमिका बजावत आहेत, पण आपल्याला अजूनही अनेक उद्दिष्टे गाठायची आहेत .... मा ना श्री शिवराजसिंह चौहान
शेतकऱ्यांचे जीवन चांगले बनवणे हे आपले कार्य आहे, शेतकऱ्यांनी देशाची अन्न सुरक्षा सुनिश्चित केली आहे ... मा ना श्री शिवराजसिंह चौहान
नवी दिल्ली,
२० मे २०२५: केंद्रीय कृषी, शेतकरी कल्याण आणि
ग्रामीण विकास मंत्री मा
श्री. शिवराजसिंह चौहान यांनी आज पूसा,
नवी दिल्ली येथील सुब्रमण्यम सभागृहात देशभरातील कृषी विद्यापीठांचे
कुलगुरू आणि भारतीय कृषि अनुसंधान परिषदेच्या विविध संस्थांच्या संचालक यांच्या वार्षिक
परिषदेचे उद्घाटन केले. या वेळी कृषी राज्यमंत्री मा श्री. भागीरथ चौधरी, आयसीएआरचे महासंचालक डॉ. एम. एल. जाट तसेच सर्व उपमहासंचालक, सहायक महासंचालक, देशातील कृषि विद्यापीठातील कुलगुरू
आणि अन्य अधिकारी उपस्थित होते.
मा श्री. चौहान यांनी यावेळी सांगितले की, आयसीएआर ही संस्था कृषी शिक्षण, विस्तार व संशोधनाचे मंदिर आहे. कृषी क्षेत्रातील आपली कामगिरी अभिमानास्पद आहे आणि आज आयसीएआर ही संस्थाच देशाचा गौरव बनली आहे. शास्त्रज्ञ सातत्याने संशोधन करत आहेत, कृषी विद्यापीठेही महत्त्वाची भूमिका पार पाडत आहेत, परंतु आपल्याला अजूनही अनेक लक्ष्ये गाठायची आहेत व गॅप भरायचे आहेत. दररोज दोन वेळा पोषणयुक्त आहार उपलब्ध करून देणे हे आपले मंत्र आहे.
मा श्री. शिवराजसिंह चौहान म्हणाले की, मी जर या इमारतीला मंदिर म्हटले असेल तर त्याचा देव म्हणजे शेतकरी आणि आपण सगळे त्याचे पुजारी आहोत. त्या शेतकऱ्याचे जीवन अधिक चांगले कसे करता येईल हे आपले कार्य आहे. शेतकरी अन्न भंडार भरतो, त्यामुळे अन्न सुरक्षा निश्चित होते. शेतकरी पृथ्वीचे रक्षणही करतो. पुढील पिढ्यांसाठीही ही पृथ्वी शाबूत राहावी. कीटकनाशके आणि रासायनिक खते यांचा अनियंत्रित वापर मातीच्या आरोग्यावर विपरीत परिणाम करत आहे. एकेकाळी अमेरिकेचे खराब पीएल ४८० गहू खावे लागत होते, आणि आज आपण ८० कोटींपेक्षा अधिक लोकांना मोफत धान्य देत आहोत. एक वेळच नाही तर दोन वेळा जेवण मिळायला हवे, पोषणयुक्त खायचे आणि खाऊ घालायचे.
मा श्री. शिवराजसिंह चौहान म्हणाले की, आपण काही मुद्द्यांवर गंभीर विचार करण्यासाठी एकत्र आलो आहोत. पंतप्रधानांचा संकल्प – विकसित भारत – हे माझ्यासाठी मंत्र आहे. मी असा कृषीमंत्री आहे जो २५ व २६ तारखेला पदयात्रा करणार आहे. लोकांना जोडण्यासाठी पायी चालणे हे सर्वोत्तम माध्यम आहे. विकसित भारतासाठी विकसित शेती आणि समृद्ध शेतकरी आवश्यक आहेत. आपले उद्दिष्ट एकच – देशाची अन्न सुरक्षा सुनिश्चित करणे आणि भारताला जगाचा फूड बास्केट बनवणे. शेतकऱ्यांचे उत्पन्नही सुनिश्चित करणे आवश्यक आहे. शेती नफा देणारा व्यवसाय झाला पाहिजे, अन्यथा शेती कोण करेल?
मा श्री. शिवराजसिंह म्हणाले की, आपली एक टीम आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांचे मार्गदर्शन लाभत आहे. आपला मंत्र आहे – एक राष्ट्र, एक शेती, एक टीम. आपण एका दिशेने पुढे जाऊ. आपली रणनीती तयार आहे. आपल्याला मिळून सहा कामे करायची आहेत – उत्पादन वाढवायचे, प्रति हेक्टर उत्पन्न कसे वाढेल, उत्पादन खर्च कसा कमी होईल, उत्पादनाला योग्य दर मिळावा, फूड प्रोसेसिंगमध्ये काय करावे, नुकसान भरपाई कशी मिळावी, शेतीचे विविधीकरण आणि नैसर्गिक शेतीला प्रोत्साहन द्यायचे.
ते म्हणाले की, आजचा एक महत्त्वाचा प्रश्न असा आहे की पुढील पिढ्यांसाठी ही पृथ्वी सुरक्षित कशी ठेवायची? आपण विचार केला की, प्रयोगशाळांतील शास्त्रज्ञ, विद्यापीठांतील कुलगुरू, केव्हीकेचे तज्ञ, राज्य सरकार, केंद्र सरकार – सगळे एकत्र यायला हवे. विकसित शेती संकल्प अभियानात आपण शेतकऱ्यांसाठी एकत्र बाहेर पडू. प्रयोगशाळेत संशोधन झाले, पण त्याचा शेतीत उपयोगच झाला नाही, तर काय फायदा? म्हणूनच ते शेतीपर्यंत पोहोचले पाहिजे. प्रत्येकजण फिल्डमध्ये उतरावा. एका जिल्ह्यात दोन टीम पाठवण्यात येतील. मी कुलगुरू व विद्यार्थ्यांना सांगतो की, तुम्ही शेतकऱ्यांशी संवाद साधा, हवामान कसे आहे, माती कशी आहे, कोणती पिके योग्य ठरतील हे जाणून घ्या. आपण प्रत्यक्षात जाऊ आणि या खरीपातच उत्पादन वाढवून दाखवू, आणि खर्च कमी करून दाखवू.
केंद्रीय मंत्री म्हणाले की, संशोधन लेख आणि पुस्तके यांचा उपयोग सामान्य शेतकऱ्याला झाला पाहिजे. विद्यापीठातून बाहेर पडणारे किती विद्यार्थी अॅग्रो बिझनेसशी जोडले गेले आहेत, त्याचे मूल्यांकन झाले पाहिजे. कुणी स्टार्टअप सुरू केला आहे का, कुणी शेती सुरू केली आहे का, हे पाहणे आवश्यक आहे. कृषी शिक्षण घेतल्यानंतर ती शिक्षण शेतीसाठी उपयोगी ठरले पाहिजे. शिक्षण हे प्रात्यक्षिक असावे. पगार व संशोधन यातील समतोल कसा असावा, संसाधनांचा उत्तम वापर कसा करावा हे पाहा. शेतकऱ्यांसाठी मोबाईल अॅप किंवा हेल्पलाइन असली पाहिजे. आपण आपल्या भागातील शेतकऱ्यांना कशी मदत करू शकतो याचा विचार करा. आपण स्वतः ठरवा की आपले विद्यापीठ देशातील टॉप तीनमध्ये कसे येईल? आधुनिक ज्ञान आणि पारंपरिक ज्ञान यांचा संगम कसा करता येईल, हे पाहा. अनेकदा शेतकरी प्रत्यक्ष अनुभवातून अधिक जाणतो. प्रत्येक कुलगुरूंनी दोन-तीन सर्वोत्तम कृती शेअर कराव्यात. सर्व विद्यापीठांमध्ये सकारात्मक स्पर्धा असली पाहिजे. केवळ कुलगुरू बनून समाधानी राहू नये, उत्तम काम करण्याचा प्रयत्न सतत असावा. पुढच्या वेळी बसलो तर आपण ठरवलेले टार्गेट गाठले का याचे रिपोर्ट कार्ड सादर करू, म्हणजेच ही बैठक सार्थ ठरेल, असे ते म्हणाले.
No comments:
Post a Comment